एका कॉलेजमध्ये “Happy Married Life” या विषयावर कार्यशाळा चालू होती.
अनेक विवाहित जोडपी त्या कार्यशाळेत सहभागी झाली होती.
प्रोफेसर मंचावर आले, त्यांनी पाहिलं की सगळे पती-पत्नी लग्नावर विनोद करत हसत होते.
तेव्हा त्यांनी सांगितलं,
“चला आधी एक खेळ खेळू – त्यानंतर विषयावर चर्चा करू.”
सगळे उत्साहाने म्हणाले, “कसला खेळ?”
प्रोफेसरांनी एका विवाहित मुलीला उभं केलं आणि सांगितलं,
“या बोर्डवर २५-३० अशा लोकांची नावं लिहा,
जे तुम्हाला सर्वात जास्त प्रिय आहेत.”
मुलीने प्रथम तिच्या आई-वडिलांची,
मग नातेवाईक, मित्र, शेजारी आणि सहकाऱ्यांची नावं लिहिली.
प्रोफेसरांनी सांगितलं –
“आता त्यातले ५ जरा कमी प्रिय लोकांची नावं पुसा.”
तीने सहज सहकाऱ्यांची नावं पुसली.
परत सांगितलं –
“आता आणखी ५ नावं पुसा.”
थोडं विचार करून तिने शेजाऱ्यांची नावं पुसली.
“आता आणखी १० नावं पुसा.”
तिने नातेवाईक व मित्रांची नावं पुसली…
आता बोर्डवर फक्त ४ नावं उरली –
आई, वडील, पती आणि मुलगा.
प्रोफेसर – “आता यातून २ नावं पुसा.”
ती अस्वस्थ झाली… शेवटी खूप विचार करून तिने आई-वडिलांची नावं पुसली.
सगळ्यांचं मन गंभीर झालं…
आता बोर्डवर उरले फक्त २ नावं – पती आणि मुलगा.
प्रोफेसर म्हणाले –
“आता शेवटचं – यातलं एक नाव पुसा.”
ती स्तब्ध झाली… डोळ्यांतून अश्रू आले…
शेवटी थरथरत्या हातांनी तिने मुलाचा नाव पुसलं…
प्रोफेसरने विचारलं,
“हेच नाव का उरलं?”
मुलीचा उत्तर मन हेलावून टाकणारं होतं:
> “आई-बाबा आता वृद्ध झालेत… काही वर्षांत ते जग सोडून जातील.
मुलगा मोठा झाला की, कदाचित तो लग्नानंतर वेगळा राहील.
पण माझा पती – तो माझ्या प्रत्येक श्वासात सामील आहे.
तो माझा अर्धा जीव आहे… आयुष्यभराचा साथीदार आहे.
म्हणूनच माझ्यासाठी तोच सर्वात प्रिय आहे.”
सगळ्या वर्गाने टाळ्यांच्या गजरात तिचं कौतुक केलं…
प्रोफेसर म्हणाले –
> “तुम्ही कितीही जोक करा लग्नावर, पण सत्य हेच आहे,
की आयुष्यभर जो तुमच्या प्रत्येक क्षणात तुमच्याबरोबर आहे,
तो म्हणजे तुमचा जीवनसाथी – तोच खरा साथी आहे.”
—
ही गोष्ट एक समज देऊन जाते –
की विवाह म्हणजे फक्त बंधन नाही, तर जीवनातील सर्वात मोठी जबाबदारी आणि नात्याची गाठ असते.