“माळी आणि बहरलेलं बाग”

एका संस्थेच्या आवारात एक सुंदर बाग होती. ती बाग तशी साधी होती, पण रोज सकाळी येणारा एक माळी – फारसे बोलत नसे, पण दिवसेंदिवस झाडांना पाणी देणे, तण काढणे, खत टाकणे, आणि वेळप्रसंगी रक्षण करणे हे त्याचंच काम होतं.

१५–२० वर्षं तो माळी रोज एकसारखा आला – पगार फार नव्हता, पण झाडं त्याची जबाबदारी होती.

त्या बागेला वळण मिळालं – ती बाग इतकी सुंदर झाली की एका मोठ्या व्यापाऱ्याने ती विकत घेतली. नवा मालक म्हणाला:

> “ही बाग खूप सुंदर आहे. पण हा माळी फार जुना वाटतो. आपण नवीन माळी ठेवूया. हा माळी कामाला हवाच असेल, तर नव्याने अर्ज करू दे.”

सर्व झाडं गप्प होती, पण माळी मनातून हादरला.
“मीच ही बाग अशी बहरवली आणि आता माझीच मुळं तोडली जातायत?”

पण त्याला सांगण्यात आलं –
“तू नको नोकरी ठेवू शकतोस, पण काहीच लाभ मिळणार नाही. नाहीतर नव्याने सुरू कर.”

माळी नाईलाजाने राजीनामा दिला. नव्या मालकाकडे तोच माळी पुन्हा ठेवला गेला – पण आधीचं काही मान्य झालं नाही. आधीचा अनुभव, वय, मेहनत – सगळं शून्य मानलं गेलं.

नवा करार, कमी पगार, नवे नियम.

त्याच वेळी इतर जुन्या मजुरांना कामातून मुक्त करून त्यांना मोठ्या रकमा (Goodwill) दिल्या गेल्या – पण माळी? त्याला फक्त एक नविन फाईलमधलं नाव मिळालं.

बोध:

> “जी बाग बहरली, तिचं श्रेय झाडांना गेलं. पण झाडांना घडवणाऱ्या माळीचा विचार कोणीच केला नाही.”

जुना माळी नको होता कारण…

1. जुना माळी म्हणजे जुनी जबाबदारी
– जुना माळी असेल तर त्याची सेवा गणली जाईल, त्याचे हक्क टिकतील, त्याला Gratuity, Retrenchment, Seniority, PF, आणि इतर कायदेशीर लाभ द्यावे लागतील.
– म्हणजेच कंपनीवर आर्थिक जबाबदारी वाढेल.

2. नव्या करारात जुना अनुभव ‘शून्य’ ठरवता येतो
– Fresh Appointment दिला की, जुना अनुभव, जुनी सेवा, सर्व काही नाकारता येतं.
– माळी तेच काम करत असला तरी कागदोपत्री तो “नवा” ठरतो.

3. कमी वेतनात अधिक काम
– जुना माळी senior झाला की वेतन वाढतं, हक्क वाढतात. पण नवा माळी म्हणून ठेवला की तो कमी पगारात अधिक काम करतो.

4. हक्क नसलेला कर्मचारी = बोलकं माणूस नाही
– नवीन नियुक्त माळीला काहीही मागण्याचा अधिकार राहत नाही.
– कंपनीला “मनासारखं” काम करवून घेणं सोपं जातं.

Avatar of netajay.com

✍️ Netajay Founder & Chief Editor – netajay.com With over 15 years of experience in social outreach, awareness campaigns, and public communication, my writing journey is not just about words — it’s about action, perspective, and purpose. Netajay.in is a modern platform of thought — a space where leadership, public interest, and truth-seeking come together. My core mission is to become a voice for the people, raise impactful issues, and shape a new era of informed and responsible leadership. I don’t just believe in the slogan “For Society, For Truth” — I strive every day to live by it.

Leave a Comment